देशाची स्थिती

हि कविता मी २००६ मध्ये लिहिली होती पण सद्ध्या देशात सुरु असलेल्या परीस्तीतीचे ती चांगल्या प्रकारे वर्णन करू शकते. मनून ती आज २०११ मध्ये पोस्ट करतोय .


बापू तुमच्या वेळी असा होत
सचोटीची कास कोणी सोडत नव्हत ||१||

नितीमत्तेची होती लाज
आता आलाय सर्वाना माज ||२||

सचोटी ,नितीमत्ता अन शील
झाले हे गुण दुर्लभ ||३||

देशासाठी तुम्ही केली सर्वस्वाची होळी
अन आम्हा दिली स्वातंत्र्याची पोळी ||४||

आता रोज इथे सौदा होतो आहे
देशाच्या अखंडतेचा अन इभर्तीचा ||५||

टाकुनी नितीमत्ता गहाण
काढला विकायला देश आम्ही ||६||

सचोटीची चाळ हि कोणास नसे
पैसे खाणे हेच आमचे कर्म असे ||७||

मानतात लोक आताचे
जुने झाले तत्व बापूचे ||८||

सत्य, अहिंसा, परमोधर्म
आम्हाला कळत नसे त्याचे मर्म ||९||

खुंटली प्रगती देशाची
करुनी राजकारणे जातीची ||१०||

स्वप्न तुमचे अखंड भारत
योजिले आम्ही जातीय भारत ||११||

सचिन गवते