प्रत्येक भारतीयाने वाचावे असे काही ..

पत्र लिहिण्यास कारण की....
माननीय,
मंत्री ,
महाराष्ट्र, भारत

विषय : इतका कमी शब्दात विषय मांडू शकत नाही ,त्यामुळे विषय वाचून पत्र फेकाण्यापैक्षा पूर्ण पत्र वाचावे ,


पत्र लिहिण्यास कारण की....
मी तसा बरा आहे ...
यंदा आपल्या कृपेने ,आत्महत्या कमी झाल्यात ..(जास्त जन उरलेच नाहीत आत्महत्या करायला ,आम्ही मोजके भित्रे बाकी आहोत फक्त ) ,
दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही.. माझा मुलाला कपडे पुस्तक खेळणी तर नाही पण त्याला एक वेळेचे अर्धवट जेवण देन्याइत्पत हिरवेगार दु:ख माझ्या शेतात
उगवले आहेत ...पावूस कमी झाला यात तुमची काहीच चूक नाही ... घामाने जितके पिकवता आले तेवढे पिकवले ...
उधार मागायला सावकाराकडे जावू शकत नाही ..पोरगी आणि बायको सोडून गहाण ठेवण्यासारखे आता काहीच उरले नाही ...
माझ्या पोरीला माझा सदरा दिल्या मुळे ती सध्या आनंदात तर म्हणता येणार नाही पण खुश आहे कारण तिचे अंग ती आता झाकू शकते ...
बायको माझी अगदी शांत आहे ..एक ही शब्द बोलत नाही .. बसल्या बसल्या कधी उगीच रडून देते बस ...
तरी तुमच्या अमाप संपत्तीतून आम्हाला काही उधार द्यावे ही विनंती ...
आमचे लचके तोडून जमवलेली ती संपत्ती आहे ..............


आपला ....



बाबा अजून काही लिहायचं आहे .. मी पोराकडे बघत होतो ..त्यानेच हे पत्र लिहिले मी सांगितले मोजक्या शब्दात होते की काय लिहायचे आहे ..
तो पत्र वाचत होतो तेंव्हा डोळ्यात पाणी आलेले ..स्वताचा राग ही आलेला ..आणि थोडे बरे ही वाटले की पोरग हुशार आहे ...
मी त्याला जवळ घेतलं ..तनु पण आली माझ्या जवळ म्हणाली बाबा मीच शिकवले आहे त्याला ..आम्हाला शाळेत बसू देत नाही ना ..तर मी त्याला शिकवते ...
मी तिला ही जवळ घेतले ...बायको भरल्या डोळ्याने अश्रू लपविण्याचा प्रयत्न करीत होती ...
तिच्या साठी मुलां साठी जगेल आयला ...
त्यांना पाहिले की एक विश्वास येतो मनात ....
मी म्हटले मल्हार ला अजून एक वाक्य टाक पत्रात शेवटी ..
तो बोललो सांगा बाबा ..म्हटले लिही

"पत्र लिहिण्यास कारण की ...
मी तसा बरा आहे ..
मी लढेल .. "

हे एकूण २४ तास मनात मी मरेल ही भीती असलेली माझी बायको सुखावली थोडी ....
आणि ओरडली ..
पुरे झाले आता ..
काम करत नाही काय नाही ..
ये तनु गिळायला वाड त्यांना ....

-- आभार : फेसबुक समीक्षक

माझा नेता (विडंबन - कुसुमाग्रजासी स्मरूनी)




‘ओळखलत का साहेब मला?’ निवडणुकीआधी आला कोणी,
कपडे होते सफेद इस्रीवाले, गळ्यात हिरेजडित मनी.

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,
‘निवडणूक तोंडावर आली, घ्या मला पाहुन’.

इकडे तिकडे पाहत हळूच त्यानी बाटली काढली,
मोकळ्या हाती जाईल कसा, एक नोटही माझ्या खिशात कोंबली.

निवडणूक झाली, महागाई वाढली, होते नव्हते गेले,
यालाच का मी मतदान केले म्हणत डोळ्यात पाणी तेव्हडे राहिले.

महागाइशी आता उर बडवून लढतो आहे
नेता मातुर माझा AC गाडीतून हिंडतो आहे.

गाऱ्हाणं माझा सांगाया दारी त्याच्या गेलो
दहा तास वाट पाहून घरी परत फिरलो

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
येवुदे पुढच्या निवडणुका, तुला घरीच बसवितो म्हणा!

साभार  - फेसबुक  थापाड्या ( Thapadya)