विरह व्याकूळ

एकदा काय झालं,
एक सरिता रागवली
आपल्या boyfriend ला म्हणाली

' हे रे काय सागर !
मीच का म्हणून ?

दर वेळी मीच का
मीच का यायचं खाली डोंगरावरून ?
आणायचं रानावनातलं सारं तुझ्यासाठी
दरी बघायची नाही
कडा बघायचा नाही
कशी सुसाट पळत येते मी
विरहव्याकुळ , संगमोत्सुक
कधी एकदा तुला गच्च मिठी मारीन
तुझ्यात हरवून , हरपून जाईन

आणि तू वेडा
तुझं लक्षच नसतं कधी
सारखा त्या चंद्रिकेकडे टक लावून असतोस.
उसळतोस तिच्यासाठी
तुझ्यासाठी पाणी आणते मी
पण तुला भरती येते तिच्यासाठी

मी नाही जा !
बोलणारच नाही आता.
येणारही नाही.
काठावरच्या लोकांना सांगून
मोट्ठं धरण बांधीन
थांबून राहीन तिथेच.
बघच मग.

सरिताच ती
बोलल्याप्रमाणे वागली.
सागर बिचारा तडफ़डला
आकसला , आतल्या आत झुरत गेला.
शेवटी फ़ुट्ला बांध त्याच्याही संयमाचा
उठला ताड
ओरडला दहाड
उफ़ाळला वारा पिऊन
लाटांचं तांड्व घेऊन
सुटला सुसाट
सरितेच्या दिशेने...

लोक येडे.
म्हणाले 'सुनामी आली ! सुनामी आली


सचिन गवते

देशाची स्थिती

हि कविता मी २००६ मध्ये लिहिली होती पण सद्ध्या देशात सुरु असलेल्या परीस्तीतीचे ती चांगल्या प्रकारे वर्णन करू शकते. मनून ती आज २०११ मध्ये पोस्ट करतोय .


बापू तुमच्या वेळी असा होत
सचोटीची कास कोणी सोडत नव्हत ||१||

नितीमत्तेची होती लाज
आता आलाय सर्वाना माज ||२||

सचोटी ,नितीमत्ता अन शील
झाले हे गुण दुर्लभ ||३||

देशासाठी तुम्ही केली सर्वस्वाची होळी
अन आम्हा दिली स्वातंत्र्याची पोळी ||४||

आता रोज इथे सौदा होतो आहे
देशाच्या अखंडतेचा अन इभर्तीचा ||५||

टाकुनी नितीमत्ता गहाण
काढला विकायला देश आम्ही ||६||

सचोटीची चाळ हि कोणास नसे
पैसे खाणे हेच आमचे कर्म असे ||७||

मानतात लोक आताचे
जुने झाले तत्व बापूचे ||८||

सत्य, अहिंसा, परमोधर्म
आम्हाला कळत नसे त्याचे मर्म ||९||

खुंटली प्रगती देशाची
करुनी राजकारणे जातीची ||१०||

स्वप्न तुमचे अखंड भारत
योजिले आम्ही जातीय भारत ||११||

सचिन गवते